Shetkari Sanghatana : हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार!| Marathi News.

News@Farmer Issue...

  Chandrapur : जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यात पावसामूळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.पंचनामे करायला कुणीच येत नसल्याचे चित्र आहे.याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड.दीपक चटप यांच्या नेतृत्वात 9 आक्टोबर रोजी जिवती तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात धडक दिली.यावेळी ॲड.दीपक चटप म्हणाले की,जिवती तालुक्यातील सातबारा अभिलेख शासनाने ऑनलाईन केले नाही,शासनाकडे तालुक्यातील दस्त अद्यावत नसतांना कागदपत्रांच्या त्रुटी नसणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे सातबारा रद्द करण्याचे आदेश देण्याचे जिवती तहसीलदार रुपाली मोगरकर,यांनी सुरू केले आहे,ऐन संकटात हे आदेश निघत असल्याने तालुक्यातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित होतील.त्यामूळे शेतकऱ्यांमध्ये तहसीलदाराविरोधात रोष तयार झाला आहे.एकंदरीत जिल्ह्यात 6 पैकी 5 सत्ताधारी आमदार असताना शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम होताना दिसणे! दुर्दैवी असून प्रशासन देखील शेतकऱ्यांसोबत असंवेदनशीलपणे वागत असल्याचे आरोप ॲड.दीपक चटप यांनी केले आहेत.

 शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असताना बांधावर सरसकट पंचनामे झाले नाही,ही आपबीती तहसीलदार यांच्यासमोर शेतकऱ्यांनी मांडली.यावर तहसीलदार यांनी तालुक्यात शेतकऱ्यांचे ओला दुष्काळाने सरसकट नुकसान झालेच नाही! असे असंवेदनशील वक्तव्य केले.संपुर्ण शेतांचे पंचनामे करण्याआधीच नुकसान न झाल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढल्यामूळे उपस्थित शेतकऱ्यांनी निषेध नोंदविला. 

  वास्तविक पाहता अतिवृष्टीमुळे यंदा जिवती तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची शेतजमीन धोक्यात आलेली आहे. पिकांचे अतोनात नुकसान झाले असताना अद्याप पंचनामे न होणे,नुकसान मदतीपासून वंचित ठेवणे आणि सातबारा बंद करणे,हे असंवेदनशील प्रकार थांबले पाहिजे; अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष सैय्यद शब्बीर जहागीरदार,तालुकाध्यक्ष सुदाम राठोड,देविदास वारे,उद्धव गोतावळे,सूरज गव्हाणे,सौरभ मादासवार यांच्यासह शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

#Jivti Taluka Shetkari Sanghatana. #Farmer Issue.

                        @@@@@@@@@@@@@@@

-:Advertisement:-