Anti-Corruption Bureau : महिला तलाठ्यांची भागीदारी, दोघींना रंगेहाथ ACB ने पकडले|Marathi News.

News@ACB Trap...

        Anti-Corruption Bureau Trap-Kinwat : कोणतेही शासकीय काम,दिल्या-घेतल्याशिवाय होत नाही? असा सर्वसामान्यांचा समज आहे.परंतू त्याला प्रत्यक्ष कृतीतून जोड देण्याचे काम किनवट येथील महिला तलाठ्यांच्या जोडगोळीने केले आहेत.शेतजमीनीचा फेर घेण्यासाठी 40 हजारांची मागणी करत तडजोडीअंती 17 हजार रुपयांवर सहमती झाली.परंतू रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.ही कार्यवाही 3 जून रोजी किनवट शहरातील गोकुंदा भागात करण्यात आली.महसूल विभागाच्या 2 महिला तलाठ्यांना लाच घेताना एकत्रीत अटक झाल्याने किनवटमध्ये एकच खळबळ उडाली आहे.भाग्यश्री तेलंगे,साजा निचपूर व सुजाता गवळे,साजा कणकवाडी ता.किनवट,असे कारवाई झालेल्या तलाठ्यांची नावे असल्याचे कळते.

          सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,वडीलोपार्जीत जमिनीचा फेर अर्जदाराच्या पत्नीच्या नावे लावण्यासाठी तक्रारदारांनी तलाठी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. या कामाच्या अनुषंगाने तक्रारदार,तलाठी भाग्यश्री यांना भेटले असता,त्यांनी 40 हजारांची मागणी केली. तडजोडीअंती 17 हजार रुपये देण्याचे ठरले.ACB पथकाने 3 जून रोजी सापळा रचून कारवाई केली.यावेळी लोकसेविका तलाठी भाग्यश्री,यांनी तलाठी सुजाता,यांना भेटण्यास सांगीतले.त्यांनी तक्रारदाराची फाईल घेवून भाग्यश्री यांच्याशी चर्चा करून परत आल्यावर ठरल्या प्रमाणे पैसे देण्यास सांगीतले.

                        "निघाले होते बदली आदेश"

महसूल विभागात विनंती अर्जावरून तलाठ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत.ACB च्या गळाला लागलेल्या तलाठी भाग्यश्री तेलंगे यांची बदली झाली होती.तसेच,त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते.मात्र,पैशांच्या हव्यासापोटी त्यांनी अन्य तलाठी सहकाऱ्यासोबत संगनमत करून जुन्या अर्जाचा निपटारा करून अधिकची माया जमवण्याच्या उद्देशाने आर्थित व्यवहार केले व ACB च्या ट्रॅपमध्ये अलगद अडकल्या.

                          "महसूल विभागाला ग्रहण."

मंत्री नरहरी झिरवळ,हे दौऱ्यावर आले असता,किनवटच्या तहसीलदार शारदा चोंडेकर,या तेथे उपस्थित राहिल्या नाही.राजशिष्टाचाराचा भंग केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.आता त्यापाठोपाठ किनवट तहसीलला अधीनस्त असलेल्या 2 महिला तलाठ्यांनी लाचखोरीचा कळस रचण्याचे काम केले आहे.एकंदर पाहता जिल्ह्यापासून 150 किलो मीटर दूर असलेल्या किनवटचे नाव चुकीच्या पद्धतीने समोर आणून तेथील महसूल विभाग चर्चेत आला आहे.लाच प्रकरणी किनवट ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती.सदर तलाठ्यांच्या घराची झडतीही सुरु आहे.ACB च्या पोलीस निरीक्षक प्रिती जाधव,सपोउपनि.शेख रसूल अरशद अहेमद खान,सैय्यद कदीर,गजानन राऊत यांच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे.

#Anti-Corruption Bureau Trap...

        ‌‌                            ----------)(-----------:Advertisement:-