Old Woman Killed in Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात महिला ठार|Marathi News...

News@Tiger Attack...

Chandrapur : जिल्ह्यातील चिमूर तहसीलच्या पळसगाव वनपरिक्षेत्रातील करबाडा येथील कंपार्टमेंट क्रं.862 मध्ये पुन्हा एका वाघाने तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या एका 54 वर्षीय महिलेवर हल्ला करून,त्याला ठार केले.14 मे बुधवार रोजी सकाळी 9 वाजता सलग चौथ्या दिवशी सदर धक्कादायक घटना घडली.कचराबाई अरूण भरडे असे मृत महिलेचे नाव आहे.ती करबाडाची रहिवासी असून तेंदूपत्ता गोळा करताना 5 दिवसांत 6 महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे.यावर्षी वाघांच्या हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झाल्याने,जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचल्याचे चित्र आहे.

          जिल्ह्यात सध्या तेंदूपत्ता तोडण्याचा हंगाम सुरू आहे. ग्रामीण भागात राहणारी कुटुंबे आपला उदरनिर्वाहसाठी तेंदूपत्ता तोडण्यासाठी जातात.याच श्रेणीत बुधवारी सकाळी 8 च्या सुमारास कचराबाई,ही महिला तिच्या पतीसोबत गावाजवळील चौधरी यांच्या शेताशेजारी असलेल्या जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेली.ती तेंदूची पाने तोडत असताना,झुडपात दबा धरून बसलेल्या एका वाघाने अचानकपणे तिच्यावर हल्ला केला.महिला ओरडली तेव्हा तिच्या पतीला जाणवले की,काहीतरी अनुचित घडला आहे.पतीने पाहिले असता वाघ महिलेला तोंडात घेऊन जाताना दिसून आला.तो घाबरला आणि ताबडतोब गावात जाऊन नागरिकांना घटनेची माहिती दिली.नागरिक घटनास्थळी आले तेव्हा कचराबाईचा मृतदेह जंगलात रक्ताने माखलेला पडून होता.घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले.मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल,वनरक्षक,पोलीस व वन कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.दरम्यान वन विभागाने मृत महिलेच्या कुटुंबाला 50 हजारांची आर्थिक मदत दिली.

                    "गावकऱ्यांची भूमिका आक्रमक."

या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी काही काळ आक्रमक भूमिका घेतली होती.वन विभागाचे अधिकारी परिसराची पाहणी करण्यासाठी आले,तेव्हा स्थानिक लोक जमले होते.दरम्यान,मृत महिलेच्या मुलाने आणि गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत जंगल आणि गावाला कुंपण घालावे तसेच मृताच्या मुलाला नोकरी द्यावी, त्यानंतरच मृतदेह ताब्यात घेतला जाईल,अशी मागणी केली.वन आणि पोलीस विभागाने संतप्त नागरिकांना शांत केले.                                "5 दिवसांत 6 बळी." 

सिंदेवाही परिसरातील मेंधमाळ येथे शनिवार 10 मे रोजी वाघाच्या हल्ल्यात शुभांगी मनोज चौधरी 38,कांताबाई बुधा चौधरी 60 आणि रेखा शालिक शेंडे 48 यांचा मृत्यू झाला.रविवार 11 मे रोजी सकाळी चिचपल्ली वन प्रकल्पातील नागाळा गावात विमल बुधाजी शेंडे 65 रा. नागाळा या महिलेचा मृत्यू झाला.सोमवार 12 मे रोजी मूल तहसीलमधील भादुर्नी येथील दीपक भेंडारे 30 रा.केवडा, या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.यासर्व घटना ताज्या असताना बुधवार 14 मे रोजी पुन्हा चिमूर तहसील मध्ये वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला.यावर्षी वाघांच्या हल्ल्यात 19 जणांचा मृत्यू झाला आहे! रोजच्या घडामोडींमुळे मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असून यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

#Tiger Attack...

#54 year-old Woman Killed in Tiger Attack...

                                       ----------()----------