News@Suicide Case...
Gadhinglaj :अतिशय खडतर परिस्थितीतून एखादा उद्योग उभा करणे,तो नावारूपास आणणे अन् त्यातून शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध करून देत,त्यांचा आधारवड बनणे,ही सोपी गोष्ट नाही. गडहिंग्लजचे युवा उद्योजक 'संतोष शिंदे' यांनी हे करून दाखवले खरे,मात्र नियतीला कदाचित त्यांची ही गरूड झेप पाहावली नसावी.आकाशातच त्याचे पंख छाटले अन् ते क्षणात जमिनीवर कोसळले. कोसळताना स्वतःच्या कुटुंबासह शेकडो कुटुंबे त्यांनी निराधार केली.संतोष यांच्या काही चुका असतीलही, परंतू निष्पाप मुलगा अर्जुनचा काय दोष,बिचाऱ्या पत्नी तेजस्विनीची काय चूक ? असे प्रश्न अनेकांना या तिहेरी आत्महत्ये Suicide च्या प्रकाराने पडले आहे.असे प्रकार भविष्यात तरी थांबावेत,यासाठी गडहिंग्लजकरांनी दाखवलेली एकजूट महत्त्वाची ठरली आहे.Santosh Shinde Suicided Case.
संतोष शिंदे यांनी अर्जुन समूहाच्या माध्यमातून तेल उद्योग,बेकरी व्यवसाय उभारले.तरुणांसाठी व्यायामशाळा, शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा याचबरोबर इतर सामाजिक कार्यातही पुढाकार घेत योगदान दिले.हे करताना त्यांच्या आयुष्यातही भयावह प्रसंग आला अन् त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला.सुरूवातीला सहज वाटणारे प्रकरण त्यांना तब्बल महिनाभराच्या जेलवारीला पुरेसे ठरले.यातच त्यांचा संयम ढासळला.आपण निर्माण केलेले साम्राज्य पत्त्यासारखे कोसळताना पाहणे कदाचीत त्यांना पटले नाही, मात्र ते खंबीर मनाचे असल्याने जेलमधून बाहेर पडताच त्यांनी पुन्हा नव्याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला.अनेकांना स्फूर्ती देणारे संतोष इतक्या सहजासहजी हरतील आणि आत्महत्या सारखा टोकाचे पाऊल उचलतील,याची कल्पनाही कुणी केली नव्हती.
"असे कोणालाही वाटत नव्हते.!"
जेलमध्येही संतोष यांनी अनेक कैद्यांनाही व्यायामाचे धडे देत,तेथेही बांधिलकी जोपासली.जेलबाहेर आल्यावर अनेकांनी त्यांना धीर देत पुन्हा उभारी घेण्याचा सल्लाही दिला.त्यांनीही मी करून दाखवेन,असे जिद्दीने सांगितले.मात्र,ती रात्र त्यांच्यासाठी फारच निर्दयी ठरली.ते इतके कूरर वागतील,असे कोणालाही वाटले नाही.जीवापाड प्रेम असणारा मुलगा अर्जुन व सर्व अडचणीत खंबीरपणे साथ देणारी पत्नी तेजस्विनी,या दोघांचाही त्यांनी सुरीने अंत केला आणि स्वतः ही त्याच सुरीने वार करत आपले जीवन संपवले.संतोषच्या आत्महत्येची बातमी समजताच अनेकांना धक्का बसला.त्याहून मोठा धक्का त्यांनी पत्नी व मुलाला संपवून आपले जीवन संपवले,याचा होता.
"कधीच न भरून निघणारी हानी ?"
संतोष गेले मात्र,त्यांनी उद्योगाच्या जीवावर उभारलेल्या शेकडो कुटुंबांवर मरणयातना भोगण्याची पाळी आली आहे.त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेकांनी त्यांच्यासोबत काम करण्यासाठी हात पुढे केले होते.अशा लोकांचा काय ? या सर्व घडामोडींमुळे संतोष अनेकांना पोरके व निराधार करून गेला.त्यांच्यावर वर ज्यांच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली अशा प्रवृत्ती गडहिंग्लज मधून हद्दपार करणे गरजेचे असल्याने गडहिंग्लजकरांनी एकजूट दाखवत या सर्वांचा निषेध व्यक्त करत कारवाईसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले.आता यात कारवाईही होईल.मात्र,संतोषसह इतर अनेक कुटुंबांची झालेली हानी कधीच भरून निघणार नाही.
"Santosh Shinde Suicided Case."
उद्योजक संतोष शिंदे यांनी पत्नी तेजस्विनी आणि मुलगा अर्जुनसह आत्महत्या केल्यानंतर गडहिंग्लज तालुक्यासह कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे.सुसाईड नोटमध्ये माजी नगरसेविका शुभदा पाटील,एपीआय राहुल राऊत यांचा नाव होता.यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.त्यांना मंगळवारी तपासासाठी फिरवले, घराची झाडाझडती,बँक तपशीलही मागवले.
Young Entrepreneur Santosh Shinde death case...
•••••<>•••••